शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

चुका केलात आता दुरुस्त्याही करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:51 IST

फलटण : ‘शेती पंपाची बिले देताना चुका तुम्ही केल्या, दुरुस्त्याही तुम्हीच करून द्या, त्यासाठी शेतकºयांना हेलपाटे मारायला लावू नका, शेतीपंपाची प्रलंबित मागणी तातडीने पूर्ण करा, ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाल्यानंतर तेथे तातडीने दुसरा ट्रान्सफार्मर बसवून द्या,’ अशा सूचना सहपालक मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.फलटण तालुक्यातील तडवळे येथे साखरवाडी, हिंगणगाव, सासवड जिल्हा परिषद ...

फलटण : ‘शेती पंपाची बिले देताना चुका तुम्ही केल्या, दुरुस्त्याही तुम्हीच करून द्या, त्यासाठी शेतकºयांना हेलपाटे मारायला लावू नका, शेतीपंपाची प्रलंबित मागणी तातडीने पूर्ण करा, ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाल्यानंतर तेथे तातडीने दुसरा ट्रान्सफार्मर बसवून द्या,’ अशा सूचना सहपालक मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.फलटण तालुक्यातील तडवळे येथे साखरवाडी, हिंगणगाव, सासवड जिल्हा परिषद गटांतील शासन आपल्या दारी योजनेंतर्गत आयोजित आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी कृष्णा खोरे महामंडलाचे माजी उपाध्यक्ष रणजिसिंह नाईक-निंबाळकर, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील, दीपक भोसले, सागर खोत, बाजार समितीचे संचालक अमोल खराडे, सिराज शेख, राजेंद्र काकडे, प्रांताधिकारी संतोष जाधव, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ डोईफोडे, उपअभियंता महादेव पाटील उपस्थित होते.मंत्री खोत म्हणाले, ‘वीजबिल दुरुस्ती किंवा रीडिंग न घेतल्याने एकदम आलेली वीजबिले दुरुस्त करून देण्याचे काम वीजवितरण कंपनीचे अधिकारी त्या गावात जाऊन करतील. संबंधित अधिकाºयांनी गावात जाऊन ग्रामपंचायत कार्यालयात बिले दुरुस्त करून द्यावीत. वीज संंबंधीच्या तक्रारी तेथेच दूर कराव्यात.’तालुक्यात सुमारे सत्तर ट्रान्सफर्मर जळाल्याचे अधिकाºयांनी सांगताच तीव्र संताप व्यक्त करीत मंत्री खोत म्हणाले, ‘नद्या, नाले, विहिरीत सध्या पाणी आहे. शेतात पिके उभी आहेत. चारा पिकांसाठी पाणी आवश्यक असताना एवढे ट्रान्सफार्मर नादुरुस्त होतात. आणि त्याठिकाणी दुसरे ट्रान्सफार्मर बसविताना विजेची थकबाकी भरण्याची तंबी शेतकºयाला दिली जाते हे अवाजवी आहे. कृषी संजीवनी योजनेंतर्गत एकदा हप्ते ठरवून दिल्यानंतर पुन्हा थकबाकीसाठी शेतकºयांची अडवणूक सहन करणार नाही.’महाराष्ट्र शेती महामंडळाकडील खंडकºयांना त्यांच्या मूळ जमिनी पाटपाण्याच्या हक्कासह परत करण्याचा निर्णय झाल्यानंतरही अद्याप अनेक खंडकरी शेतकºयांना जमिनी मिळाल्या नाहीत. काहींना खराब व नापिक जमिनी दिल्या आहेत. त्याचबरोबर एक एकरापेक्षा कमी क्षेत्र मिळणार असलेल्या खंडकºयांना न्याय मिळाला नसल्याबद्दल प्रांताधिकारी यांना सविस्तर अहवाल तयार करून देण्याच्या सूचना खोत यांनी बैठकीतच दिल्या.